पुणे:पुन्हा एकदा शासनाच्या कर्मचाऱ्यांचा ढिसाळपना समोर आलेला आहे, अधिकाऱ्यांनी कुठलीही शहानिशा न करता ट्राफिक सिग्नल कंट्रोल पोल नव्याने बसवण्यात आले आहे, स्वतःची आणि ठेकेदाराची पोडगी भरण्यासाठी टेंडर काढण्यात आली आहे, यात काही शंका नाही. असा आरोप आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी आमच्याशी बोलताना केला, पुढील माहिती अशी जे धे चौक ( स्वारगेट ), शिलाई वर्ल्ड चौक बाजीराव रोड, गोळीबार मैदान चौक, धोबी घाट चौक, घोरपडे पेठ चौक, रेस कोस चौक सोलापूर रोड, अशा अनेक पुण्याच्या चौकांमध्ये गरज नसताना ट्राफिक कंट्रोल पोल बसवण्यात आलेले आहेत, यामध्ये काही सिग्नलचे बल्प गेलेत तेच नुसते बदलून सिग्नल चालू झाले असते, काही ठिकाणी तर जुने पोल पाठीमागे नवीन पोल त्याच्यापुढे त्यामुळे वाहन चालकांना सिग्नल चालू आहे की बंद दिसत नाही, चांगले असताना सुद्धा संपूर्ण बदलण्याचा घाट कशासाठी याची चौकशी झाली पाहिजे नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग शासन अधिकारी घेताना वारंवार दिसत आहे, सध्या ह्यांच्यावरती अंकुश कोणाचा राहिलेला नाही, आमदार, खासदार आरोप प्रत्यारोप आणि भांडणांमध्ये मग्न आहेत, दुसरीकडे शासन अधिकारी मात्र याचा फायदा घेताना दिसत आहे. प्रशांत कांबळे







