सुकळी :प्रतिनिधी (सुखदेव गायकवाड )शेवगाव तालुक्यातील कांबी येथे आज बुधवार (दि.९) पासुन अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कार्यक्रमास सुरुवात होत असुन बुधवार (दि.१६) पर्यंत चालणारा हा सप्ताह सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्वा.सु.नि.सद्गुरु विश्वासनंद महाराज यांच्या असीम कृपेने ह.भ.प.श्री प्रल्हादगिरी महाराज मठाधिपती विश्वासनंद संस्थान कांबी यांचे प्रेरणेने तसेच वै.मु.लक्ष्मण महाराज बाठे यांचे आशिर्वादाने व ह.भ.प.अशोक भारती यांचे शुभहस्ते व सर्वश्री विक्रम महाराज पुरी, किशोर महाराज भिसे, भाऊसाहेब महाराज पन्हाळकर, कृष्णा महाराज कुऱ्हे यांचे मार्गदर्शनाने संपन्न होत असल्याबाबतची माहिती आयोजकांनी दिली आहे.या सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम गीतापाठ, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, दुपारी २ ते ४ संगीत रामायण, ५ ते ६ हरीपाठ, रात्री ९ ते ११ पर्यंत हरी किर्तन, व त्या नंतर हरी जागर होणार असुन याच काळात ह.भ.प.विनोदाचार्य सुधीर महाराज भोसले, गायनाचार्य तेजस महाराज गायकवाड, रामायणाचार्य ह.भ.प.भानुदास महाराज खरात, विद्वतरत्न ह.भ.प.विकास महाराज औटी, ह.भ.प.संदीप महाराज सालवडगावकर या नामवंत महाराजांची किर्तन सेवा पार पडणार आहे.ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प.अशोक महाराज भारती, दत्ता महाराज बोरकर, गणेश महाराज गाढे, कृष्णा महाराज शिंदे हे करणार आहेत.तर राम कथा प्रवक्ते म्हणून ह.भ.प.अशोक महाराज हे असुन बुधवार (दि.१६) रोजी सकाळी १० ते १२ या वेळात भारती महाराज यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन होऊन त्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.सोहळ्याचे ५८ वे वर्ष असुन कांबी परिसरातील भाविक भक्तांनी या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा.असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.






