प्रतिनिधी : ( सुखदेव गायकवाड , शेवगाव येथील सर्व समाज बांधवांचे ग्रामदैवत हजरत सय्यद सोनामियावली साहब यात्रेनिमित्त सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी फुलांची चादर मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये विनाकारण लाठी चार्ज करून महिला, लहान मुले व तरुणांना जखमी करून जाणीवपूर्वक जातीय द्वेष निर्माण करणाऱ्या शेवगावच्या पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, वंचितचे शिष्टमंडळ व सकल मुस्लिम समाज, शेवगाव यांनी केली आहे. अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, फिरोज पठाण, ॲड. योगेश गुंजाळ, अन्सार भाई कुरेशी, जावेद शेख, अकील पठाण, मेजर अंजन चव्हाण, समीर शेख, राजू बागवान, दानिश बागवान, गोडाजी चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवार दि.२६ डिसेंबर रोजी हजरत सोनामिया यात्रेनिमीत्त फुलांची चादर मिरवणुक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकिची परवानगी शेवगाव पोलिस स्टेशन यांनी रात्री १० वाजेपर्यंत दिली होती. परंतु आंबेडकर चौक ते शिवाजी चौक पर्यंत रात्री ९ वा. मिरवणुक आली असता, शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी हे तेथे आले व त्यांनी मिरवणुक बंद करा असे सांगितले. मिरवणुकिमधील तरूणांनी त्यांना म्हणाले की, साहेब आम्हाला १० वाजेपर्यंतची परवानगी दिली आहे. तरी सुध्दा तुमच्या विनंतीला मान देवुन आम्ही फक्त एक गाणं *तुम्ही कितीही लावा शक्ती, कितीही लावा युक्ती, तुम्ही किती करा हल्ला, लय मजबुत भिमाचा किल्ला हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर* वरील गाणे वाजवू द्या खुप विनवण्या केल्यानंतर आम्हाला हे गाणं वाजवण्याची परवानगी दिली. परंतु दोन मिनीटानंतरच शेवगावचे पोलिस निरीक्षक यांनी आपल्या सोबत आणलेल्या पोलिस कर्मचारी CRPF जवानांना विनाकारण लाठीचार्ज करायला लावले. यामध्ये बहुतेक महिला, लहान मुले व नागरीक गंभीर जखमी झाले. याबाबत सर्व व्हिडीओ क्लिप, सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे फोन संवाद , बाबत सर्व पुरावे जमा करून जखमी व्यक्तींचे जबाब नोंदवून शेवगाव येथील पोलीस निरीक्षक विलास पुजारी व विनाकारण लाठी चार्ज करणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्वरित निलंबित करण्यात यावे असे म्हटले आहे.या निवेदनावर वंचित चे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, प्यारेलाल शेख, राजेंद्र नाईक, सलीम शेख जिलानी, अरविंद साळवे, लक्ष्मण गोरे, रवींद्र निळ, गोरख तूपविहिर, अन्सार भाई कुरेशी, फिरोज पठाण, रोहित पाटोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे या बाबत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली






