अहमदनगर :प्रतिनिधी. ( सुखदेव गायकवाड)स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोग महाराजांच्या वैभव खालील परंपरेतील थोर संत सद्गुरु भगवान बाबाचे शिष्य श्रीक्षेत्र भगवानगडाचे द्वितीय महंत परमपूज्य भीमसिंह महाराज एक वारकरी सांप्रदायाला लाभलेली महान विभूती होती. गुरुवर्य बाबांनी आपल्या हयातीत अहोरात्र वारकरी संप्रदायाची सेवा केली. श्रीक्षेत्र भगवान गडाच्या माध्यमातून भक्ती ज्ञान वैराग्याचा प्रचार व प्रसार केला. वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांच्या काळात जन्माला आलेले बाबा वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचे आवडते शिष्य बनले वैकुंठ वाशी मामासाहेब दांडेकरांच्या आज्ञेने श्रीक्षेत्र भगवानगडाचा स्वीकार केला. व सद्गुरु भगवान बाबांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचते केले भगवानगडावर राहत असताना त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, परंतु बाबांनी न डगमगता गादी व्यवस्थित सांभाळली. बाबा उत्तम कीर्तनकार होते तसेच ते पट्टीचे म्हणणारे व वाजवणारे ही होते लोक त्यांच्या कीर्तनात मंत्रमुग्ध होत असत. बाबांनी संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तनाचे कार्यक्रम केले आज गावोगावी त्यांचे पुण्यतिथी सोहळे चालू आहेत सुकळी, महंत टाकळी, लाडजळगाव ,खरवंडी ,साष्ट पिंपळगाव, शोभा नगर अशा अनेक गावी बाबांची पुण्यतिथी साजरी होत आहे. श्रीक्षेत्र भगवान गडावर गडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री बाबांची पुण्यतिथी गडावर भव्य दिव्य अशी साजरी करतात जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत बाबांना आदराचे स्थान होते. हरिभक्त परायण महंत नामदेव महाराज शेकटेकरांनी गुरुवर्य बाबांना आदराचे मुरमी, सुकळी, धुमेगाव, महंतटाकळी ,कांबी ,शहागड अशा अनेक गावी आणले होते. महंतटाकळी वर बाबांचे विशेष प्रेम होते बालमटाकळीला बाबा सद्गुरु भगवान बाबांनी सुरू केलेल्या सप्ताहात न चुकता येत असत अशा थोर सत्पुरुषाच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महंत टाकळी येथे पुण्यतिथी सोहळा संपन्न होत आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी ह. भ. प .गौतम महाराज गुंजाळ तसेच जोग महाराज संस्थेचे माजी विद्यार्थी व माऊली संस्थान बोरी पिंपळगाव आणि तुकाराम महाराज भीमसिंह महाराज मंदिराचे संस्थापक ह .भ. प. महंत नामदेव महाराज यांचे कीर्तन, भजन ,प्रवचन ,हरिपाठ ,काकडा, गीता पाठ ,विष्णुसहस्रनाम ,आदी कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी ह.भ.प चंद्रकांत महाराज गरड, रामेश्वर महाराज कऱ्हे, स्वराज महानोर, रामदास महाराज, सोमनाथ महाराज पवार, गणेश कवळे, गणेश पोपळघट, सुदाम देवा केसभट, आबासाहेब जावळे राहतील.






