पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराला आणखी जास्त पाणीपुरवठा उपलब्ध करणे गरजेचे आहे. शहराला टाटा धरणातून पाणी आणावे लागेल. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड बनवला जात आहे. पीएमपीएमएल सक्षम केली जात आहे. मेट्रोचे जाळे वाढवले जाते आहे. शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणखी जास्त राबवावे लागतील. पिंपरी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील जागेवर रमाई स्मारक होणार आहे. हे स्मारक नावाला साजेसे होणार आहे.भाजपचा मतदार शिस्त पाळणारा..मावळ मध्ये काही जणांनी कटकारस्थान केले. परंतु भाजपचा मतदार शिस्त पाळणारा आहे. तो मतदार महायुतीचा धर्म पाडून सुनील शेळके यांना मतदान करेल. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. सुनील शेळके यांना भाजपने मदत केली पाहिजे. महायुतीच्या माध्यमातून राज्यासाठी मोठी ताकद उभी करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.







